शासन आपल्या दारी.
शासन हे पूर्णपणे जनतेच्या पैशाने चालणारी व्यवस्था आहे . जनतेच्या महत्वाचे दस्त सांभाळणारी व्यवस्था म्हणजे सरकारी अभिलेख कार्यालये व कायदा आणि सुव्यवस्था ,शांतता म्हणजे प्रशासन हे सर्व एकत्र करून आम्ही निवडून दिलेले विश्वस्त यांनी नागरिकांच्या सोया सुविधा यासाठी काम करणे म्हणजे सरकार. या सरकारच लोकांसाठी काम करणे म्हणजे लोकशाही . यात कुठलाही फाजील शब्दछल नाही. असे जर आहे तर आमच्या पैशांचा चुराडा करून स्वतः केलेले काम केल्याचा धिंडोरा कशासाठी पिटताय ? यासाठीच तर तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे . शासन आपल्या दारी मध्ये समृद्धी महामार्ग , तलाठी भरती , सिंचन प्रकल्प यांचा काय संबंध ? मनमानी करून लोकांच्या मतदानाचा सोयी नुसार अनादर करून सरकार चालवताय. जनतेच्या संतापला असे इव्हेंट करून घेऊन सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे .
#नाशिक #शासन_आपल्या_दारी
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 15, 2023
सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने एका वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सर्व निर्णय सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, विद्यार्थी तरूणांच्या हिताचे… pic.twitter.com/E1STHVNoal
रखडलेले प्रकरण तुमच्या सरकारच्या नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण
या नागरिकाने सार्वजनिक केलेले हे सहा वर्ष रखडलेले प्रकरण तुमच्या सरकारच्या नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण असू शकते . तुमच्या सरकारकडून नोकरशहांना दिली गेलेली सूट आज नागरिकांचा छळ करीत आहे . त्यांच्यावर तुमचा अंकुश नाही . किंबहुना तुम्ही फाजील राजराणात गुंतल्याने तुम्ही या नागरी छळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत . विरोधकही तुमचेच सहकारी आहेत . त्यांच्यावर तरी कुठे जनतेसाठी काम करण्याचे संस्कार शिल्लक आहेत . ते जर शुद्धीत असते तर तुम्ही जनतेचा पैसे असा उधळू शकले नसते .
हेच काय #शासन_आपल्या_दारी ६ वर्षे झाली आहे अजूनही माझ्या आईला न्याय मिळाला नाही..
— प्रतिक मुंबईकर (@MumbaikarPratik) July 16, 2023
👇👇https://t.co/042vnBKAro
सरकारात हिंमत असेल तर कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी निश्चितीचा कायदा करा
या आणि अशा लाखो समस्या आहेत . कि ज्या सरकार सामान्य नागरिकांसाठी काम करत नसल्याचे जिवंत पुरावा म्हणून समाजासमोर येत आहेत . तुम्हाला जर दाखले वाटायची एव्हढी हौस आहेत तर सरकारीं कार्यालयात कारकून का नाही झाले ? हे काम तुमचं आहे का ? हे काम ज्यांच्या कडून करून घ्यायला पाहिजे त्यांना जनतेला छळण्याची सूट दिली आहे. त्यांना मोकाट सोडले आहे . तुमच्या सरकारात हिंमत असेल तर सर्व श्रेणीतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी निश्चितीचा कायदा करा . व ज्यांच्या मुळे किंवा ज्यांनी प्रकरण लांबलं आहे. त्याच्या वेतनातून अर्जदाराला नुकसान भरपाईचा पर्याय निर्माण करा. म्हणजे “शासन आपल्या दारी ” असले इव्हेंट घेण्याची गरज पडणार नाही.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @ChDadaPatil @AjitPawarSpeaks @AshokPawarMLA @ChakankarSpeaks @ChitraKWagh
— AMOL SAWARGAONKAR (@Amolbhartiya) July 11, 2023
जय हिंद जय भारत
सर्वांना विचारु इच्छीतो, जर एका माय माऊलीचा सर्वेसर्वा पती आज जगातून निघुन गेला असेल, त्या दुखाः सोबत पतीच्या डोक्यावरील कर्ज… pic.twitter.com/f1LjSDygok
आज रोहित पवार हि पोस्ट टाकत आहेत . ते आता विरोधात आहेत . त्यांनी फक्त या कार्यक्रमासाठी या सरकारने किती खर्च केला ते सार्वजनिक करावं आणि आपण सरकारात असलो तर असा दिखावा करणार नाही याची ग्वाही द्यावी. यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी . यासाठीचा कायदा बनविण्यासाठी आग्रही असणार हे जनतेला सांगावं .
'शासन आपल्या दारी' उपक्रमाची #पोलखोल pic.twitter.com/EiDcPE9u7g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2023