सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न
पंढरीच्या वारीला ज्यांना पंढरपुरात जाता आलं नाही . अशासाठी व वारीतून परतीचा प्रवास सुरु झाला कि ,त्याचा मागोवा,सुखरूपाता हि आपल्या वारकरी सोबत्यांना कळावी म्हणून वाटेत येणारे देवस्थानात दर्शन घ्यायचे असे अलिखित प्रघात आहेत . याचाच भाग म्हणजे राहुरी ,नेवासा, पुणतांबा याठिकाणी हे वारकरी येतातच .
याच कारणांनी पुणतांबा येथे या आषाढी एकादशीला परिसरातून दिंड्याच्या माध्यमातून भाविक येतात . हे वर्षानवर्ष सुरु आहे . हि गाव मुख्य प्रवाहात नसल्याने याकडे सरकारच नेहमीच दुर्लक्ष आहे .परिणामी अनेक नागरी सुविधांचा अभाव इथे दिसून नाहीतर जाणवतो .
यंदाच्या वारीत यावर समाजातला शेवटचा घटक हाही व्यक्त झाला हि बाब समस्त राजकारणी व प्रशासन यांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे . हा घटक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार पर्यंत आपले म्हणणे पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे . समाजातील हा बदल चांगलं आहे . तसेही या मुद्द्याकडे मुख्य प्रसार माध्यमांचे लक्ष नसल्यानेच समतोल विकास साधला गेला नाही हे मान्य करावं लागेल .