परधाडेजवळ रेल्वेचा विचित्र अपघात झाला असून पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाश्यानी आग लागल्याच्या अफवेतून उड्या मारल्याने १२ जण दुसऱ्या लाईनवर येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली चिरडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी पाहुणे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यातील जखमींना वैद्यकीय उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात व दोन खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान दुर्घटनेनंतर सात मृतांची ओळख पटल्याची माहीती मिळाली या घटनेची माहिती मिळताच परदेशी असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्दैवी घटने वर आपल्या संवेदना व्यक्त करीत मृतांना ५ लाखांची मदत .जाहीर केली व जखमीवर मोफत उपचाराची तातडीने सोय करण्याचे आदेश दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावहून मुंबईकडे जात असताना पुष्पक एक्सप्रेसमध्ये आगा लागल्याची अफवा पसरली, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी चालत्या एक्सप्रेसमधून उड्या मारल्या, मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने उड्या मारलेल्या प्रवाश्याना चिरडले. त्यात १२ प्रवाशी ठार झाले, त्यामध्ये ९ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनच्या संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized with PageSpeed Ninja