आपत्ती व्यवस्थापन,आणि आपण
आपल्या देशात आपत्ती व्यवस्थापन हा विषय २००५ मध्ये अस्तित्वात आला . एक कायदा या वर्षी बनवला गेला . अर्थात हा आमच्या मालकीचा कायदा आहे . कारण हा आमच्या स्वतंत्र भारताला सहावा सातवा कुचकामी कायदा आहे . ज्याची अंमलबजावणी सुरु झाली खरी पण या कायद्याने आज मितीला आत्महत्या केलेली आहे . असेच म्हणावे लागेल. आमची नोकरशाही व कायदेमंडळ हे फक्त कायदा बनवतात . त्याची रचना व इमानदारी हे देव भरोसे आहे . हे जर खरोखर इमानदारीने लोकउपयोगी बनवला असता , तर आपल्याला रॅड ने बनवलेला संसर्ग रोग प्रसार प्रतिबंधक कायदा १८९७ वापरावं किंवा लागू करण्याची गरज पडली नसती . यावरून आपल्या स्वातंत्र्याची लायकी सिद्ध होते .
आमच्या आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी असे व्हिडीओ का बनवत नाहीत ? कारण ते काम तास करत नाहीत . ते आपल्या कामात जीव ओतत नाहीत . बहुदा ते या कामासाठी परफेक्टही नाही . असेल तर त्यांनी असा टायमर लावून तयार होऊन दाखवावं .