शेकडो परिवारांनी आपले आप्त गमावले, ही चूक आपल्याकडे नको.
देशात महाकुंभमेळा आयोजन करण्यात आले. सुमारे एकशे चौरेचाळीस वर्षानी हा योग आल्याची जाहिरातबाजी करण्यात आली. खूप शानदार नियोजन केल्याच्या बातम्या देशभरातील नव्हे तर विदेशातील हिंदू समाजाला आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्या.
पण चुकीची माहिती देण्याची किंमत शेकडो सामान्य हिंदूंनी आपला जीव गमावून मोजली आहे. अशा या पत्रकारितेने देशवासीयांचे नुकसान झाले आहे. एक सामान्य नागरिकाने पोस्ट केलेल्या व्हिडिओने कुंभमेळयाचे वास्तव व देशवासीयांची फसवणूक करणारी पत्रकारितेचा बुरखा फाडला आहे.
दलाल पत्रकारों द्वारा बताई गई शानदार व्यवस्था की सच्चाई..!
— Dinesh Chauhan (@dinesh_chauhan) January 29, 2025
सैकड़ों लोग मर जाए लेकिन मालिक नाराज़ नहीं होना चाहिए pic.twitter.com/OU9s2WPj9E
घटना घडली. चेंगराचेंगरी झाली. असंख्य भाविक मृत्यूमुखी पडली. आता सत्य लपवण्यात काय आणि का स्वारस्य आहे ? उत्तर प्रदेश प्रशासनाला . आणि सत्य लपवण्यासाठी तुम्ही पत्रकारांना दडपशाही करणार का ? ही पत्रकारितेची दुसरी बाजू आहे. जी घटनेची गंभीरता , घटनेची वास्तवता दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला अटकाव करून एव्हढी मोठी दुर्घटना लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न उत्तरप्रदेश सरकारचे प्रशासन करीत आहे.
प्रयागराज के मेडीकल कालेज में जहां शव रखे गये हैं वहां पर रिपोर्टर को जाने से रोका जायेगा तो शक जरूर होगा कि मरने वालों की संख्या सरकार छुपा रही है ?
— Deepak Sharma (@DeepakSEditor) January 31, 2025
और अगर संख्या छिपा रही तो यह एक बड़ा विवाद बनेगा।
संसद सत्र चल रहा है योगी सरकार को इस मामले में तथ्यों को सामने रख देना चाहिये । pic.twitter.com/ABsiAWRnfp
धर्मावर श्रद्धा आणि आस्था आहे. म्हणूनच सामान्य पापभीरू देशवासी महाकुंभ मेळयाला गेले होते. पण इथे केलेल्या व्ही व्ही आय पीच्या दिमतील प्रशासन जुंपलेले होते. जिथे चेंगराचेंगरी झाली तिथे पोलिस उपलब्ध नव्हते. एक महिला पोलिस आपल्या अधिकाऱ्याला सोशल मीडियाच्या सहाय्याने मदत मागत होती. हे देखील सोशल मीडिया वर आलेलं आहे. जग गतिमान झाले आहे. या व्ही आय पी लोकांना खरोखर स्वर्ग प्राप्त होणार आहे का ?
#महाकुंभ में हुई भगदड़ पर लोगों ने क्या कहा सुनिए pic.twitter.com/ft08zuwb0k
— मिस्टर इंडिया (@mistarindia624) January 30, 2025
महाकुंभ से एक महिला सिपाही का वीडियो वायरल है और वो बता रहीं हैं कि सर जल्द से जल्द फोर्स भेजिए यहां पर कंडीशन बहुत खराब है और मैं हर चीज वीडियो में नहीं बता सकती हूं. pic.twitter.com/DE154hMHzj
— Puneet Kumar Singh (@puneetsinghlive) January 31, 2025
एकीकडे महाकुंभ होणार , आपल्याला चार पैसे मिळतील. व्यापार वाढेल. अशीच अपेक्षा स्थानिक व्यापारी वर्गाची असते. पण या कुंभमेळयात झालेल्या चेंगराचेंगरीने भाविकांनी जिथे आश्रय घेतला त्यांचे किती नुकसान केले. त्याशिवाय याच दुकानाजवळ लोक मृत्यू पावली. हे सत्य सांगणारी ही मुलाखत आहे.
उत्तर प्रदेश सरकार को इस लड़की के ऊपर गैंगस्टर एक्ट और रासुका लगा कर जीवन बर्बाद कर देना चाहिए ,
— खुरपेंच (@khurpenchh) January 30, 2025
जो काम इस देश की मीडिया नहीं कर पाई वो काम देश की दो बेटियों ने कर दिया , पूरे देश के मीडिया और उत्तर प्रदेश के प्रशासन को आईना दिखा कर ।#MahaKumbh2025 pic.twitter.com/ZCe53nPH2s
आजचे हे सदर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी आहे. कारण आपल्याकडेही या कुंभमेळयाचे आयोजन होणार आहे. अर्थात नाशिक , त्र्यंबकेशवर , ब्रम्हगिरी आणि परिसर इथेही अशीच गर्दी होणार आहे. यात योगी सरकारने व्ही व्ही आय पी भक्त आणि सामान्य भक्त यांच्यात जो भेदभाव केला त्याची किंमत सामान्य भाविकानी मोजली आहे. याच एका कारणाने योगीची व्यवस्था व नियोजन हे बदनाम झाले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे बोलघेवड्या धिरेन्द्र शास्त्रीने तर कळसच केला आहे , “ज्याने इथे ज्यांनी जीव गमावला आहे, त्यांना मोक्ष मिळाला ” असे विधान करून आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. ज्या कुटुंबाने आपल्या माय ,बहीण , भाऊ , वडील , आजी,आजोबा गमावले आहेत त्यांची हानी कुठल्याही स्नानाने आता भरून निघणार नाही.त्यांच्या अनेक पिढ्यांना हा कुंभमेळा स्मरणात राहील.